Skip to main content

 तिल्लारीच जंगल - सिंधुदुर्गातील अमेझॉन


आठवडाभर गोव्यामध्ये धुव्वा केल्यानंतर येताना आंबोलीत मुक्काम करण्याचा विचार होता. पण वेगळे काही तरी बघावे म्हणून
Anish Pardeshi
Kaka Bhise
दोघांनीही वानोशीचा पर्याय सुचवला.
सिंधुदुर्ग म्हटल्यावर तारकर्ली, वेंगुर्लासह इतर समुद्र किनारे असतानाही आम्ही दोडामार्गमधील तिल्लारी जंगलात जायचं ठरवलं. तिल्लारी, वानोशी, दोडामार्ग ही नाव तशी अनेकांसाठी अपरिचित आहेत. पण आवर्जून सांगते तुम्हाला नवीन, हटके काही बघायचं असेल तर वानोशीला भेट दिलीच पाहिजे.

प्रवीण देसाई या तरुणामुळे गेल्या काही वर्षात कुडासे गावातील वानोशी हे नाव चर्चेत आलयं. उच्चशिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे किंवा मुंबईत जाऊन नोकरी करणे सहज शक्य असतानाही, प्रवीणने गावताच राहण्याचा निर्णय घेतला. नावाच्या अर्थाप्रमाणेच वानोशी हे वनाच्या कुशीतील गाव म्हणता येईल. दोडामार्गमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवीणने पहिला वहिला होम स्टे सुरु केला आहे. टापटिप, हवेशीर अशा या होमस्टेमध्ये जेवणही स्थानिक पद्धतीचे मिळते.




प्रवीण स्वतः उत्साही असल्याने आम्ही पोहोचल्यावर त्याने आपण काय काय बघू शकतोय याची यादी सुरु केली. आमचं जंगल किती युनिक आहे, इथले प्राणी, पक्षी, नदी, दुर्मिळ झाडे, देवरायांबद्दल तो भरभरून बोलत होता. होम स्टे जवळ त्याने मचाण बांधले आहे. त्यावर बसून आम्ही रात्री गव्यांची वाट पाहिली. पण आज गव्यांच दर्शन दुर्लभ आहे लक्षात आल्यावर तो आम्हाला रात्री जंगलात फिरायला घेऊन गेला. रात्रीच्या वेळी एखाद्या देवराईत फिरण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता. प्रवीणबरोबर रंगलेल्या गप्पा, बलाढ्य अशा झाडांखाली उभे राहून तो देत असलेली माहिती, गावातील किस्से, जंगलाची वैशिष्ट्ये ऐकताना मजा आली.
दुसऱया दिवशी प्रवीणचा मित्र विशाल सकाळी सात वाजताच दुर्बिण घेऊन हजर होता. तिल्लारी नदीपासून सुरु झालेला आमचा जंगल ट्रेक पुढे तळकट अभयारण्यामध्ये संपला. दोडामार्ग परिसर म्हणजे जणू पक्ष्यांचे नंदनवन आहे. ग्रेट हॉर्नबिल, मलबार हॉर्नबील, पाईड हॉर्नबील, विविध प्रकारचे फ्लायकॅचर्स, हळद्या, सुतारपक्षी, तांबटसह अनेक प्रकारचे पक्षी, शेकरु बघायला मिळाले. (कॅमेरा घरी राहिल्याने फोटो काढता आले नाहीत 😔. डोळ्यांनी मनसोक्त बघण्याचा आनंद घेतला )
दोडामार्गमधील जंगल पिंजून काढायचे असेल तर महिनासुद्धा कमी पडेल, एवढे विस्तीर्ण असल्याचे जाणवले. पर्यटकांच्या नकाशापासून अद्याप दूर असल्यामुळे या भागात मोजकेच लोक येतात. जंगल भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांचे प्रमाण अर्थातच जास्त असते.
वनसंवर्धन आणि पर्यटनातून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, असं प्रवीणला वाटतं, त्यामुळेच त्याने गावात राहण्याचा निर्णय घेतला. इथे येणाऱया प्रत्येकाकडून त्याचे कौतूक होते आहे. त्याच्या कामाला प्रोत्साहन मिळते आहे.








( काळी किनार)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा तालुका गोव्याच्या जवळचा. हा तालुका पश्चिम घाटाच्या कुशीत वसला आहे. आजही येथील अनेक लोक नोकरी गोव्यात करतात. महिन्याचे सामान, इतर खरेदी देखील त्यांची गोव्यातूनच होते. गोव्या एवढाच दोडामार्ग निसर्गसंपन्न प्रदेश आहे. येथील खनिज संपत्तीमुळे केवळ गोव्यातील नव्हे तर इतर राज्यातील उद्योजकही दोडामार्गमधील तिल्लारीच्या वनक्षेत्रावर नजर ठेवून आहेत. गेल्या काही वर्षात केरळमधील रबर उद्योजक लॉबीनेही आता तिल्लारी जंगलातील खाजगी डोंगर ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. जंगल तोडून तिथे मोठ्या प्रमाणात रबराची लागवड सुरु आहे. कागदावर पेन्सिलने झाडांचे चित्र काढावे आणि मधूनच काही भाग रबराने खोडून टाकावा, असं काहीसं चित्र काही भागात दिसतं आहे.
अप्रतिम निसर्गसौंदर्य, विपुल वन्यजीवन आणि फुलपाखरु, पक्ष्यांच्या वैविध्याने अशा या तिल्लारी जंगलाला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी अलीकडील काही वर्षात तरुण पिढी पुढे आली आहे. निसर्ग अभ्यासक
Raman Kulkarni
Faruk Mhetar
, प्रशांत जाधव,
Pravin Desai
ही मंडळी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. नेचर कॅम्पच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱयातील छायाचित्रकरांना ते दोडामार्गमधील जंगल वैभव दाखवत आहेत. पर्यटनातून लोकांना रोजगार उपलब्ध झाल्यास ते स्वतः पुढे येऊन जंगल वाचवतील यासाठी तरुण निसर्ग अभ्यासकांचे प्रयत्न सुरु आहेत.

चैत्राली चांदोरकर

Comments

Popular posts from this blog

अनुभवा वाघांच्या पलीकडचे जंगल रंग बदलणारे सरडे, सरपटणारे प्राणी, वैविध्यपूर्ण रंग आणि मधुर शीळ घालून आकर्षित करणारे पक्षी, फुलपाखरे, आपली नजर चुकवून सभोवताली फिरणारे गवताळ प्रदेशातील प्राणी अन् आकर्षक फुलांनी बहरलेले डेरेदार वृक्ष बघण्यातही एक वेगळी मजा आहे. वाघांचे अस्तित्व नसलेल्या अभयारण्यांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे विभागातील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य, रेहेकुरी काळवीट अभयारण्य, भीमाशंकर शेकरू अभयारण्य आणि करमाळा-नान्नज माळढोक अभयारण्य आता वेगळ्या रूपात पर्यटकांसमोर येणार आहे. ................... चैत्राली चांदोरकर .....................  रोजच्या धकाधकीच्या जीवनचक्रातून रिफ्रेश होण्यासाठी सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य, शांत ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे; पण वाढत्या संख्येमुळे या निसर्गरम्य स्थळांनाही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसते. मोठमोठी हॉटेल्स, गेमिंग झोन, शहरी वस्तूंनी फुललेल्या बाजारपेठा अन् वाहतुकीची कोंडी.... हेच चित्र एखाद्या हिलस्टेशनवर अनुभवायला मिळत...
आता स्थलांतर वाघांचे   ..................................... व्याघ्र संवर्धनाची दिशा निश्चित करण्यासाठी ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ आणि ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे व्याघ्र संवर्धनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी आशियातील विविध देशांच्या मंत्र्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान वाघांची संख्या अत्यल्प असलेल्या देशांमध्ये वाघांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतातील काही वाघांचे लवकरच कंबोडियात स्थलांतर होणार आहे.   जंगलातील अतिशय देखणा, रुबाबदार आणि राजबिंडा प्राणी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जगात शंभर वर्षांपूर्वी तब्बल एक लाख वाघ जंगलात वास्तव्यास होते. घरातील अनेक बुजूर्ग मंडळींनी वाघांचा हा घटता आलेख अनुभवला आहे. राजामहाराजांच्या काळात, अगदी ब्रिटिशांची राजवट संपल्यानंतरही काही वर्षे वाघांना मारण्यासाठी सरकारकडून बक्षीस जाहीर केले जात असे. या काळात बदुंकांच्या साह्याने शिकार करणे सोपे झाल्याने झपाट्...
फॅशन इंडस्ट्रीचे मृगजळ पर्यावरणाच्या मूळावर    मोठमोठ्या हॉटेलमध्ये होणारे फॅशन शो, मॉलमधील काचेच्या कपाटातील कपड्यांनी भारतीय ग्राहकांवर मोहिनी घातली आहे. पण अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगक्षेत्रातून लाखो टन कचऱ्याची निर्मितीही होते आहे. पर्यावरणीयदृष्ट्या विघटनास अवघड असलेल्या कपड्याच्या कचऱ्याचे करायचे काय... हा नवा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. ................ देशातील वाढता ई-कचरा, जैववैद्यकीय कचऱ्याची दखल घेऊन केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच या कचऱ्याच्या विल्हेवाटीची नियमावली जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ शहरातील राडारोडा आणि ओला-सुक्या कचऱ्यासंदर्भातील निमयावली प्रसिद्ध झाली आहे. पुढील दहा ते पंधरा वर्षांत या सर्वांबरोबरच कपड्यांच्या कचऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक असलेल्या या कचऱ्याला पेलण्यासाठी आत्तापासूनच खरे तर स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे. आपण दररोज वापरणारे कपडे खराब झाल्यावर अनेकदा गरजू व्यक्ती, भांडी विकणाऱ्या बाईला देतो किंवा थेट फेकून देतो. पुढे या ...