Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015
पॅरिस अनुभवताना...     सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुण्याचा अभिमान बाळगून पॅरिसमध्ये मी प्रवेश केला; पण ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, परंपरा... याविषयी आत्मीयता असणे म्हणजे काय, याचा नेमका अर्थ मला तिथे उलगडला. पॅरिसमधील लोक आपल्या शहरावर प्रचंड प्रेम करतात आणि तेथील सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात.   तापमानवाढीच्या दुष्परिणामांना रोखण्याबाबत कायदेशीर कटिबद्धता दर्शविण्यासाठी जगातील १९० देशांचे धोरणकर्ते दोन आठवडे पॅरिसमध्ये जमले होते. हवामानबदलाच्या या परिषदेला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने पॅरिस या सुंदर शहराची हवा अनुभवयाला मिळाली. पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या पहिल्या पाचातील या शहरातील मुक्काम सुखद तर ठरलाच; पण त्याच्याही पलीकडे जाऊन खूप काही शिकवणारा ठरला. आपल्या शहरावरील प्रेम केवळ बोलून न दाखविता कृतीतून दाखविण्यापासून ऐतिहासिक परंपरा जपण्यापर्यंतचे अनेक धडे या शहराने दिले. त्यामुळे पॅरिस थेट हृदयात जाऊन बसले आहे. परिषदेचे ठिकाण आणि मी राहत असलेले होस्टेल यांच्यात चांगलेच अंतर असल्याने मध्यवर्ती शहरात...
हवामानबदलाची चर्चा एकमेकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत सुरू झालेल्या पॅरिसमधील जागतिक हवामान परिषदेने चार दिवसानंतर रंग दाखवले. संपन्न देशांची स्वार्थासाठी एकी झाली अन् गरीब देशांनी अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी बंड पुकारले. भारताने मात्र यात गेमचेंजरची भूमिका बजावली. या परिषदेला उपस्थित राहून नोंदवलेली काही निरीक्षणे.... पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानात होत असलेल्या वाढीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान बदल आराखडा समितीने नव्वदच्या दशकांपासून सुरू केलेल्या बैठकीचा एकविसावा अध्याय नुकताच पॅरिसमधील ल बुर्जे येथे रंगला. आत्तापर्यंत झालेल्या या बैठकांमधील हा अध्याय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा होता. तसेच या परिषदेकडून अपेक्षाही मोठ्या होत्या. यामध्ये प्रत्येक देशाला स्वतःची जागतिक पातळीवरील स्थान आणि ताकद दाखविण्याची संधी मिळणार असल्याने प्रत्येकाने त्याची विशेष तयारी केली होती. विकनसशील देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत आणि चीन या दोघांना या बैठकीत सर्वांत महत्त्वाचे स्थान मिळाले. या बैठकीमध्ये भारताने संपन्न देशांच्या दृष्टिकोनातून खलनायकाची, तर ...
तापमानवाढीचे राजकारण....   विकासाची स्वप्ने बघतानाच प्रत्येक देशाने स्वतःवर हरित वायू उत्सर्जन कमी करण्याचे बंधन स्वीकारावे, यासाठी जगातील १२९ देशांच्या धोरणकर्त्यांची जागतिक हवामान बदल परिषद (विश्व पर्यावरण संमेलन) उद्यापासून पॅरिसमधील ल बुर्जे येथे सुरू होते आहे. विकसनशील असलेला भारतही यामध्ये महत्त्वाची भूमिका मांडणार आहे. यानिमित्ताने... एरवी अभ्यासकांपुरता मर्यादित असलेल्या ग्रीन हाउस गॅस, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या संज्ञा सर्वसामान्यांच्या तोंडी यायला लागल्यालाही आता दशकाहून अधिक काळ उलटला आहे. भौतिक विकास साध्य करण्यासाठी मानवाकडून होत असलेल्या बेफाम इंधनवापरातून कार्बन आदी प्रदूषित वायू उत्सर्जित होत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असून, हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. गेल्या काही वर्षांत अवेळी पाऊस पडण्याचे, दुष्काळाचे, गारपिटीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याकडे अंगुलिनिर्देश करीत हवामान बदलाचा हवाला अगदी स्थानिक पातळीवरूनही दिला जात आहे. इंधनाचा वापर सर्वाधिक असलेल्या दे...